Showing posts with label Global. Show all posts
Showing posts with label Global. Show all posts

Sunday, April 12, 2020

देशाचं हित कुणाच्या हातात?

देशाचं हित कुणाच्या हातात?

मागील काही दिवसांपासून राज्यसह संपूर्ण देश लॉकडाऊन मध्ये आहे. कोविड १९ कोरोना या विषाणूनमुळे राज्य, देशच नव्हे तर संपूर्ण जग बंद पडलं आहे. चीनच्या वुहान मधून सर्वदूर पसरलेल्या या व्हायरस ने मोठ्या शहरांसोबत छोट्या छोट्या खेड्यांत देखील शिरकाव केला आहे. या विषाणूसाठी अजून लस उपलब्ध नसली तरी आपण काही नियम पाळून त्याला रोखू शकतो, पण नियम कुणासाठी??

               वुहान जे की कोरोना व्हायरसचं केंद्रबिंदू होतं, तिथून हा व्हायरस गेला आणि ७६ दिवसांनी तेथील लॉकडाऊन हटवण्यात आलं. तेथील जनतेने पाळलेल्या कडक नियम आणि शिस्त यामुळेच ते यातून पार पडलेत. युरोपियन देश आणि अमेरिका सध्या ज्या स्थितीत आहेत त्या परिस्थिती पासून भारत लांब असला तरी काही लोकं नियम धाब्यावर बसवून गर्दी करताना दिसतच आहेत. 
               केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रशासनाला सोबत घेऊन या विषाणू विरुद्ध लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. डॉक्टर्स, पोलीस आणि अत्यावश्यक सेवा पुरवणारे सारेच आपल्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पण सरकारने सांगितल्याप्रमाणे "सोशल डिस्टन्स" मात्र काही लोकं पाळताना दिसत नाहीत. 
               देश संकटात असताना देशाचे नागरिक या नात्याने आपले पण काही कर्तव्य आहेत ज्याला आपण तयार राहील पाहिजे, पण काही ना काही कारणं काढून लोकं गर्दी करतच आहेत. संचारबंदी असतानाही स्वतःला सुशिक्षित समजणारे देखील सकाळी मॉर्निंग वॉक ला जात आहेत, या मध्ये तरुणांच्या बरोबरीने या विषाणूच्या घातक पातळीवर असणाऱ्या वयोगटातील म्हणजेच वृद्ध व्यक्तिंचाही समावेश पाहायला मिळतो.
               सुट्या मिळाल्या आहेत म्हणून घरी न थांबता काहीजण पार्ट्या करण्यात गुंग आहेत. ग्रुप करून पोहायला जाणे, काट्यावर जमून गप्पा मारणे, गावातून बिनकामाचा फेरफटका मारणे असे प्रकार देखील दिसत आहेत. देशसेवेसाठी कधीही तयार असं म्हणणारे मात्र प्रत्यक्षात उलट वागताना दिसत आहेत. त्यांचं देशप्रेम कमी आहे अशातला भाग नाही पण त्यांना या विषाणूंची भीतीच राहिलेली नाही. 'मला नाही होणार' असं त्यांना वाटतं असलं तरी 'माझ्यामुळे कोणाला व्हायला नको' ही भावना निर्माण होणं गरजेचं आहे. 
               काही ठिकाणी दोन तीन दिवस १००% लॉकडाऊन केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी यात्रेप्रमाणे गर्दी होताना दिसत आहे. मुंबई सारख्या रेड झोन मध्ये असणाऱ्या ठिकाणी सुद्धा भाजीपाला, मासे घेण्यासाठी लोकांची गर्दी बघून परिस्थिती अजून किती भयानक होऊ शकते हे समजू शकते. धारावी सारख्या गर्दीच्या ठिकाणी या रोगाचे खूप रुग्ण आढळून येत आहेत. तसेच वरळी मध्ये देखील रुग्णांची संख्या जास्त आहे. पण तरी देखील मुंबई मधील गर्दी "स्पिरिट ऑफ मुंबई" च्या नावाखाली जमतच आहे. हे भयानक आहे. २०१९ ला कोल्हापूर, सांगली ,सातारा जिल्ह्यातील महापुरावेळी परिस्थिती खूप वाईट होती. त्यावेळी लाईट नव्हती, दूध, छोटे दवाखाने,भाजीपाला मार्केट सर्व बंद होतं. मोठ्या शहराचा संपर्क तुटला होता तरीही लोकांनी धीर सोडला नाही. सर्वजण प्रशासनाला साथ देत होते.
               सर्व जबाबदारी प्रशासनावर आणि सरकारवर टाकून नाही चालणार, आपण देखील आपली जबाबदारी उचलायलाच हवी नाही तर आपली परिस्थितीसुद्धा युरोपीयन देशांसारखी व्हायला वेळ लागणार नाही. घरातील एखादी व्यक्ती अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जात असेल तर त्याची योग्य ती खबरदारी त्या व्यक्तींबरोबरच घरच्यांनी देखील घ्यायला हवी. किराणा, भाजीपाला आणि औषध आणण्यासाठी घरातील एकाच व्यक्तीला पाठवाव आणि समान धुवुनच आत घ्यावं. घरातील एखादी व्यक्ती ऐकत नसेल तर त्यांना परिस्थिती नीट समजावून सांगा. 
               शासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे आणि जो कोणी करत नसेल त्यालाही नियमांचे पालन करण्यास सांगावे, काही लोकांच्यामुळे नियम पाळणाऱ्या व्यक्तींनाही याचा त्रास होऊ शकतो. येत्या काही दिवसांत कोरोनाला आपण हारवूच पण त्यासाठी आपला खारीचा वाटा असणं तितकंच महत्वाचं आहे. देशासाठी आणि आपल्या भविष्यासाठी घरीच थांबुया आणि देशसेवा करूया....

: - स्व,
१२ एप्रिल,२०२०
कोल्हापूर

Tuesday, March 31, 2020

दिलासादायक: ओझोनचे छिद्र भरण्यास सुरुवात

 'मॉन्ट्रियल कराराचा इफेक्ट'
           अंटार्क्टिका वरील ओझोन छिद्र नैसर्गिकरित्या भरून येत आहे, त्यामुळे दक्षिण गोलार्धातील वातावरणात होणारे अनेक चिंताजनक बदल प्रत्यक्षात थांबण्यास मदत होईल. कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण असले तरी ही एक दिलासा दायक अशीच बातमी आहे. 
            गेल्या काही दशकात मानवी कृत्यांमुळे ओझोन चे संतुलन बिघडत चालले होते, १९८७ चा माँट्रियल करार व १९८९ च्या लंडन परिषदेमुळे ओझोन अवक्षयाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले आहे. अनेक राष्ट्रांबरोबरच भारत ओझोन समस्येबाबत जागृत व जबाबदार राष्ट्र आहे. 

            स्थितांबरात असणार्‍या ओझोनामुळे सूर्याकडून येणार्‍या अतिनील किरणांचा काही भाग शोषला जातो आणि सजीवांना पोषक एवढीच उष्णता भूपृष्ठावर येते. त्यामुळे अतिनील किरणांपासून सजीव सृष्टीचे संरक्षण होते. अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, डोळ्यांचे विकार इ. अनेक विकार जडतात. स्थितांबरातील या ओझोनाच्या रूपाने पृथ्वीभोवती एक सुरक्षा कवच निर्माण झाले आहे.
            तसेच नासाने दिलेल्या माहितीनुसार एकट्या चीन मधील कॉर्बन मोनोक्सीड चे प्रमाण मागील वर्षापेक्षा ३० ते ४०% नी कमी आलं आहे.

Image Source: ladbible.com
ओझोन म्हणजे काय ?

- ओझोन हा ऑक्सिजनचाच एक प्रकार आहे, त्याचे रासायनिक सूत्र O3 आहे. सजीवांना श्वसनासाठी  लागणार ऑक्सिजन म्हणजे O2.
- ओझोन हा आपल्या वातावरणाचा एक भाग आहे, त्याचे अस्तित्व मानवी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 
- बहुतेक ओझोन वातावरणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 ते 40 कि.मी. पर्यंत उंचीवर असतो. या प्रदेशास स्तिथांबर म्हणतात.

ओझोन संबंधी अंतरराष्ट्रीय करार:- 

- Vienna Convention for the Protection of the Ozone Layer: २२ मार्च १९८५

- The Montreal Protocol on Substances that Deplete the Ozone Layer: १६ सप्टेंबर १९८७

- १५ ऑक्टोबर २०१६ रोजी किगाली (रवांडा) येथे भरलेल्या परीषदेत Montreal Protocol मध्ये दुरूस्ती करण्यात आली.

काही तरी बोल ना

 काही तरी बोल ना दिवसेंदिवस तुझा हा दुरावा कधी येऊन संपावशील? प्रेमाचे चार शब्द एकवूनी पुन्हा मला आपलंसं करशील तयारच आहेत कान माझे मन ही आतु...