Tuesday, March 31, 2020

दिलासादायक: ओझोनचे छिद्र भरण्यास सुरुवात

 'मॉन्ट्रियल कराराचा इफेक्ट'
           अंटार्क्टिका वरील ओझोन छिद्र नैसर्गिकरित्या भरून येत आहे, त्यामुळे दक्षिण गोलार्धातील वातावरणात होणारे अनेक चिंताजनक बदल प्रत्यक्षात थांबण्यास मदत होईल. कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण असले तरी ही एक दिलासा दायक अशीच बातमी आहे. 
            गेल्या काही दशकात मानवी कृत्यांमुळे ओझोन चे संतुलन बिघडत चालले होते, १९८७ चा माँट्रियल करार व १९८९ च्या लंडन परिषदेमुळे ओझोन अवक्षयाचे गांभीर्य लोकांच्या लक्षात आले आहे. अनेक राष्ट्रांबरोबरच भारत ओझोन समस्येबाबत जागृत व जबाबदार राष्ट्र आहे. 

            स्थितांबरात असणार्‍या ओझोनामुळे सूर्याकडून येणार्‍या अतिनील किरणांचा काही भाग शोषला जातो आणि सजीवांना पोषक एवढीच उष्णता भूपृष्ठावर येते. त्यामुळे अतिनील किरणांपासून सजीव सृष्टीचे संरक्षण होते. अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग, डोळ्यांचे विकार इ. अनेक विकार जडतात. स्थितांबरातील या ओझोनाच्या रूपाने पृथ्वीभोवती एक सुरक्षा कवच निर्माण झाले आहे.
            तसेच नासाने दिलेल्या माहितीनुसार एकट्या चीन मधील कॉर्बन मोनोक्सीड चे प्रमाण मागील वर्षापेक्षा ३० ते ४०% नी कमी आलं आहे.

Image Source: ladbible.com
ओझोन म्हणजे काय ?

- ओझोन हा ऑक्सिजनचाच एक प्रकार आहे, त्याचे रासायनिक सूत्र O3 आहे. सजीवांना श्वसनासाठी  लागणार ऑक्सिजन म्हणजे O2.
- ओझोन हा आपल्या वातावरणाचा एक भाग आहे, त्याचे अस्तित्व मानवी आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 
- बहुतेक ओझोन वातावरणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 ते 40 कि.मी. पर्यंत उंचीवर असतो. या प्रदेशास स्तिथांबर म्हणतात.

ओझोन संबंधी अंतरराष्ट्रीय करार:- 

- Vienna Convention for the Protection of the Ozone Layer: २२ मार्च १९८५

- The Montreal Protocol on Substances that Deplete the Ozone Layer: १६ सप्टेंबर १९८७

- १५ ऑक्टोबर २०१६ रोजी किगाली (रवांडा) येथे भरलेल्या परीषदेत Montreal Protocol मध्ये दुरूस्ती करण्यात आली.

Monday, March 30, 2020

३० मार्च, राष्ट्रीय डॉक्टर्स डे Doctors Day

३० मार्च, राष्ट्रीय डॉक्टर्स डे

आज ३० मार्च, जागतिक डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टर्स ना खूप शुभेच्छा.
समाजातील एक असा घटक ज्याची गरज आज खाऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला पटली आहे. डॉक्टर म्हणजे देव असं आपण आधी मानतो. जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत विविध ठिकाणी आपला आणि डॉक्टर्स यांचा संबंध येत असतोच.

माणूस खुश असेल तर त्याला दगडात सुद्धा देव दिसतो आणि तोच जर दुःखी झाला तर देवालाच नावं ठेवतो, अगदी तसच काही डॉक्टरांच्या बाबतीत देखील घडतं. पेशंट ठणठणीत झाला तर डॉक्टर म्हणजे परमेश्वर आणि चुकून दगावला तर हेच डॉक्टर पेशंटच्या नातेवाईकांसाठी राक्षस किंवा पैसे खाणार देखील होऊन जातो. प्रसंगी डॉक्टर्स,नर्स, स्टाफ यांच्यावर हात देखील उगारला जातो. गरज आहे ती दृष्टीकोण बदलण्याची.

इमेज सौर्स  www.oneindia.com

खेडोपाड्यात आजही कितीतरी माणसं वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावतात, कितीतरी स्रियांची प्रसूती योग्य प्रकारे होत नाही, कितीतरी लहानं मुले जन्मतः अपंगत्व घेऊन जन्माला येतात. याला डॉक्टर जबाबदार नाहीत, अपुऱ्या सोई सुविधा, औषधे आणि लोकांमध्ये न झालेली जनजागृती जबाबदार आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रूपाने खेडोपाड्यात दवाखाना , डॉक्टर्स पोहचले पण त्यांना हव्या त्या सुविधांचा अजूनही अभाव आहे. घरापासून लांब, स्वतःच्या परिवारापासून लांब राहून डॉक्टर्स सुविधा पुरवत आहेत.

भारत आज विकसनशील देशांमध्ये देखील पुढं आहे. पण तरीही आरोग्याविषयक असणारं बजेट हे कमीच आहे. आज जगाला नोवेल कोरोना व्हायरस ने भंडावून सोडलं आहे. त्यामुळेच भारतातील आरोग्यसेवेचा प्रश्न पुन्हा वर आला आहे. भारत भविष्यात आरोग्यसेवेमध्ये देखील अग्रेसर होईल अशी आशा आहे.


विजय बाबासाहेब गुरव
३० मार्च,२०२०
कोल्हापूर

Monday, June 3, 2019

बदललेले गाव


बदललेले गाव 

बदलले गाव मात्र
ओढ कधी बदलत नाही.
लांब जावे जितके,
तितकीच ओढ वाढत जाई.

एकटा असलो जरी,
भास सारखा होतो राही.
नसतील सोबत तरी,
आवाज आपल्यांच्या ऐकू येई.

क्षणभर राहून दंग,
पुन्हा वर्तमानात वावरायचे की?
सोबतच आहोत म्हणत,
खोलवर स्वप्ने पांघरायचे ती ?

स्वप्नांचे काय हो
कधी दिवसा कधी येतील राती.
स्वप्नांचाही पलीकडे असतील 
जपलेली ती जवळची नाती. 

ध्येयपूर्तीसाठीचा हा दुरावा
कष्टाने मंतरलेला.
आठवणींच्या जोरावर 
नव आव्हाने पांघरलेला.

ध्येयाच्या प्राप्तीसाठी
स्वप्नांची तलवार होईल.
आठवणींना घेऊन सोबत 
भासांची हि  ढाल होईल.

चांगलं ध्येय ठेवलंय,
आता सारं चांगलंच होईल.
बदललेल्या गावापासून
सगळीकडे नाव होईल.
बदललेल्या गावापासून 
सगळीकडे नाव होईल...Vj

:- स्व                     
  २७ मे, २०१९        
 पुणे.                     

Wednesday, February 27, 2019

रुसवा तुझा

रुसवा तुझा...


अनेकदा ती मला भेटायला बोलवायची,
'वेळेवर येतच नाहीस' म्हणत रुसून फुगून बसायची.

तिला भेटण्यासाठी मग मीही गडबडीत निघायचो ,
उतरताच गाडी वरून आवरतच पुढे जायचो.
आलो भेटलो तरी ती फक्त एक कटाक्ष टाकायची,
माझा नेहमीचा उशीर बघून रुसून फुगून बसायची.

मी यायचो मीच बोलायचो, ती काहीच नाही बोलायची,
प्रेमाची घेत परीक्षा, मी मनवाव याची प्रतीक्षा करायची.
समोर तीच्या जाऊन बसलो, डोळ्यातसुद्धा नाही पहायची,
'छान! वेळेत आलास' म्हणत आणखीनच चिडून असायची.

मग करायचो कसरत, जगाची मला पर्वाच नसायची.
रुसवा तीचा काढताना खोटी कारणं तरी कितीदा द्यायची,
देत कारणे, उडवत खिल्ली शक्य तितके प्रयत्न करायचो
झाली का शांत? गेला का राग? हळूच तिला पाहायचो.

डोळ्यांत बघताच माझ्या, गालावर तिच्या कळी खुळायची,
'गप तू,बस शांत'..म्हणत मला प्रेमळ दमच द्यायची.
'नक्की वेळेत येईन' सांगून तासंतास गुंतून जायचो जायचो.
 पुढच्या भेटीसाठी मात्र वेळेआधीच मी जाऊन थांबायचो.

पुन्हा नको रुसवा-अबोला म्हणून थोडी काळजी घ्यायचो.
पुन्हा नको रुसवा-अबोला म्हणून थोडी काळजी घ्यायचो.


Vj
:- स्व
२७ फेब्रुवारी, २०१९
कोल्हापूर.

Sunday, January 27, 2019

"....वेडा प्रयत्न सुरू आहे.."

"....वेडा प्रयत्न सुरू आहे.."

 छंद तुला पाहण्याचा,
तुला जाणून घेण्याचा,
तुझ्या विश्वात रामण्याचा...
वेडा प्रयत्न सुरू आहे


तुझ्या वाटेवर थांबण्याचा,
गर्दीत तुला शोधण्याचा,
हाव-भाव तुझे वेचण्याचा...
वेडा प्रयत्न सुरू आहे


तुझी नजरा-नजर होण्याचा,
हळूच दुसरीकडे पाहण्याचा,
ओळखीत अनोळखी दाखवण्याचा...
वेडा प्रयत्न सुरू आहे.


तुलाच पाहत राहण्याचा,
नकळत हास्य लपवण्याचा,
तुझ्यात हरवून जाण्याचा...
वेडा प्रयत्न सुरू आहे.

Vj
:- स्व
26 जानेवारी 2019
पुणे 

Sunday, October 21, 2018

भरारी मला घेऊ दे

तुझ्यासाठी सुचलेल्या ओळी
 जेंव्हा तूच वाचतेस,
तेंव्हा मन खूप बिथरून जात
 कारण प्रत्यक्षात तू समोर नसतेस।

वाचून त्या ओळी ज्या तुझ्याच आहेत
काय वाटलं असेल तुला ज्यात स्वतःच आहेस
राहिला असेल काय संपूर्ण प्रसंग तुझ्या समोर
की गेल्या असतील ते स्मरणीय क्षण गुदमरून।

खरच बिथरून जातो मी या अश्या प्रश्नांनी
ज्याची प्रश्नसुद्धा तूच आहेस आणि उत्तरे सुद्धा तूच
वाटत जे होत ते यावं पुन्हा नव्याने आयुष्यात
पण आता आहे त्यात का करावा असा अट्टाहास।

वाटत रे खूप पण आता वाटण्याला सुद्धा मर्यादा आहेत
घेऊन स्वप्ने नवी नाती, संकटांना तोंड देत जगायचं आहे।
जुन्यातच रमत बसलो तर वर्तमान काय म्हणेल?
फक्त विचारच करत बसलो तर भविष्यातही हाती काही नसेल.


तुझ्यासाठी सुचलेल्या ओळी  जेंव्हा तूच वाचतेस,
तेंव्हा मन खूप बिथरून जात कारण प्रत्यक्षात तू समोर नसतेस।
दे पुन्हा साद मला तू पेटून आता उठू दे 
तुझ्या शब्दांना सोबतीला घेऊन भरारी मला घेऊ दे।
तुझ्या शब्दांना सोबतीला घेऊन भरारी मला घेऊ दे।...vj

Sunday, August 19, 2018

अटल बिहारी वाजपेयीजीं को भावपूर्ण श्रद्धांजली



अटल आपकी कविताएं ,
यही आपकी भाषा थी।
अटल आपकी सोच में
देशभक्ति की अभिलाषा थी।


अटल आपके विचार से,
प्रेरित सारा संसार था।
विचारोंकी लढाई थी,
पर मन मे आपके प्यार था।


अटल आपके शरीर ने
बस छोड़ा जग का मैदान हैं।
आपकी सोच विचार ही,
आज हमारे लिए वरदान हैं।

आपकी सोच- विचार ही,
आज हमारे लिए वरदान हैं।...vj


भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजीं को भावपूर्ण श्रद्धांजली

Saturday, August 18, 2018

फिर से उभर तू आज में



*  फिर से उभर तू आज में  *


तेरी आज की हंसी 
दबी हैं कल के शोर में
जो हुआ उसे भी लेकर साथ
फिर से उभर तू आज मे।

जाने कितने ठोकर 
और जिंदगी ले आएगी
खुद को रख संभल कर 
तेरी हिम्मत ही काम आएगी।

बचा बचाया सिमट के
कर हौसला तू बुलंद आज
ये वक्त भी बदल जायेगा कल
खुद पर तुझे होगा नाज़।

तेरे कर्म क्या अच्छे बुरे 
होगा हिसाब बाद में
जो हुआ उसे भी लेकर साथ
फिर से उभर तू आज मे।
जो हुआ उसे भी लेकर साथ
फिर से उभर तू आज मे। ...vj





जिंदगी की जंग में बहुत से पल हताश कर जाते हैं, लेकिन उसमें से भी उड़ान भरने की जिद दिल में होनी चाहिये.. हमे हर ऐसी स्थिति में खुद के भीतर जरूर झांक कर देखना चाहिए शायद रास्ता दिखे, लेकिन एक उम्मीद की किरण जरूर मिल जायेगी।

Saturday, August 4, 2018

सोबत...

सोबत...

सोबतीला माझ्या आहेस तू नेहमी
अशीच सोबत देशील का ?
कधीतरी चिडलो चुकून ओरडलो 
तरी मला समजून घेशील ना ?

राग व्यक्त होतो तुझ्यावर 
प्रेम हि व्यक्त करतोच कि
तू हि चिडतेस रुसतेस माझ्यावर
तेंव्हा मीही तुझ्यामागे झुरतोच कि

लाडाने बोलतेस हक्काने सांगतेस
अशीच बोलत राहशील ना ?
रुसवा काढायची अन तुला हासवायची
संधी मलाच देशील ना ?

येतील नवं नवीन नाती पुढे,
हे नातं अतूटच ठेवशील ना ?
सुखीच राहा नेहमी तू,
माझं हि सुख वाटून घेशील ना ?
माझं हि सुख वाटून घेशील ना ?


vj

प्रेम हे असं भावनिक मिश्रण आहे की ते कधीच विसरलं जाऊ शकत नाही. 👍

Saturday, March 17, 2018

नव्हतं प्रेम हे क्षणातलं...

आतुर मी तिला भेटण्यासाठी, ती होती आतुर तशीच,
मी होतो नेहमीच तिचा, आज तीही झाली माझीच.
बघणं आमचं व्हायचं रोज, बोलणं मात्र कधीच नाही
वाट बघत थांबायचो मी, तीला फक्त जाण्याची घाई.

माझ्या भावना तिला समजल्या ? फक्त हे देवालाच माहित.
तिच्या मनात नेमकं काय? भाव कधी समजलेच नाहीत.
नजरा-नजर झाली अनेकदा , ती तर रोजच व्हायची,
वाट बघत पुन्हा थांबायचो , ती तशीच निघून जायची.

आज मात्र भिडली नजर , समोरच तिच्या झालो स्तब्ध,
योगायोग अन नशीब माझे? सुचलेच नाहीत काही शब्द.
पाहून मला क्षणभर थांबली, पुन्हा गेली तिच्या वाटेवर,
मागे वळून तिने बघितलं, स्वार झालो मी लाटेवर.

इतके दिवस झुरत राहिलो, पाहून वाट ती येण्याची,
मी होतोच तीचा नेहमी, अन ती माझी होण्याची.
बघताच मागे तिने मला, चेहऱ्यावर नवं लकेर उमटली
नकळत तिची झुकली नजर, अन गालावरची खळी चमकली.

चमकणारी खळी गेली सांगून, गुपित काय तिच्या मनातलं,
तीही आज झाली माझी , नव्हतं प्रेम हे क्षणातलं.
दोघांचेही मन आज जुळले , जणू चंद्र चांदणं नभातलं
तीही आज झाली माझी , नव्हतं प्रेम हे क्षणातलं.
तीही आज झाली माझी , नव्हतं प्रेम हे क्षणातलं...



टिप--
वरील ओळी स्वतःबद्दल आहेत अशा वाटू शकतात, याचा कोण्या व्यक्तीशी अथवा घटनेशी संबंध नाही तसे झाल्यास अगर वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा 😂😂😂.
Like, Comment, Share करण्यास हरकत नाही.

Tuesday, September 12, 2017

तू अशी अबोल


दोघांचं बोलणं म्हणजे दंगा मस्ती
खुप काही चेष्टा आणि नखरेच जास्ती
बोलशील हसत आणि करशील शांत
मला गप्प बसवणे हा तुझाच प्रांत


संपत नसत बोलण आपलं
तरीही ठेवावा लागतो फोन
बोलणं एकेकदा होतही नाही
नेमकं गायब असतं कोण?


किती बालिश पण सच्च्या गोष्टी
एकमेकांना आपण असतो सांगत
अनेकदा तर लहान असूनही आपण
समजूतदारपणे असतो वागत


आज तू वाटलीस जरा शांत
हरवली होतीस स्वतःच्या मनात
तरीही आपलं बोलणं झालं
शांत का हे लक्षात नाही आलं


कशी रे तू अशी वेगळी मस्त,पण
स्वतःला ठेवतेस विचारांत व्यस्त
अशी एकटी अबोल नको बसू फक्त
आहेस तशीच आवडतेस सर्वांना जास्त



Vj
10 सप्टेंबर 2017
पुणे

काही तरी बोल ना

 काही तरी बोल ना दिवसेंदिवस तुझा हा दुरावा कधी येऊन संपावशील? प्रेमाचे चार शब्द एकवूनी पुन्हा मला आपलंसं करशील तयारच आहेत कान माझे मन ही आतु...